Thursday, December 24, 2015

आज २४ डिसेम्बर।९१ वर्षापुर्वी म्हणजेच १९२४ ला याच दिवशी अमृतसर जवळच्या कोटला सुल्तानसिंग नावाच्या खेड्यात एका मुलाचा जन्म झाला।जेव्हा तो ७-८ वर्षाचा होता,तेव्हा त्या गावात रोज एक फ़क़ीर यायचा।दारोदार भटकत पंजाबी सूफी भजनं म्हणत भिक्षा मागत पुढे जायचा। या छोट्या मुलाला त्या फकीराची गाणी खुप आवडायची।मग त्या सुरांच्या ओढ़ीनं,कळत नकळत तो गावच्या वेशी पर्यंत त्या फकीराच्या मागे मागे जायचा।त्या फकीराचं हे ऋण,तो मुलगा आयुष्यभर विसरला नाही।त्या छोट्या मुलाचा तो फ़क़ीर म्हणजे पहिला गुरु होता।त्या फकीराचं पुढे काय झालं,माहित नाही।हा मुलगा मात्र पुढे मोहम्मद रफ़ी म्हणून पुढे नावरूपास आला. त्याने सुरांचं जग काबिज केलं।पण एवढाच त्याच्या आयुष्याचा पैलू नव्हता।जेवढा तो गायक म्हणून मोठा झाला,कदाचित एक फ़रिश्ता म्हणून त्याच्याकड़े अधिक पहिल्या गेलं।व्यक्ती कोणीही असो त्याने सर्वांना सन्मानानेच वागवलं।अफाट यश आणि एवढी विनम्रता,याचं तो एक अफ़लातून मिश्रण होता।त्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणुस हा मनापासून त्याचाच होऊन गेला।अवघं ५५ वर्षाचंच आयुष्य त्याला मिळालं।पण जेव्हा तो गेला,सर्वांच्याच डोळ्यात एक न संपणारा शोध देऊन गेला।

गोष्ट १९६३ ची आहे.त्या दिवशी मुंबईमधे वादकांचा संप होता।त्यांच्या काही मागण्या होत्या।शंकर जयकिशन नेहमी प्रमाणे आपल्या स्टूडियो मधे पोहचले।स्टुडिओच्या दरवाज्यात सगळे वादक ठिय्या देऊन  होते।शंकर जयकिशन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते।पण त्यांचे हे प्रयत्न व्यर्थच ठरत होते । शेवटी जयकिशनने रफ़ी साहेबांना,आज रिकॉर्डिंग होणार नाही असा निरोप देण्यासाठी फोन लावला।तेव्हा त्यांच्या घरुन कळलं की रफ़ी नुकतेच स्टूडियोसाठी निघाले आहेत।त्यांनाही शंकर जय प्रमाणे या संपाची कल्पना नव्हती।इकडे संप मागे घेण्याचे शंकर जयचे प्रयत्न सुरूच होते। तेवढ्यात रफ़ी साहेबांची गाडी आली.आज रफ़ी साहेब गाणार आहेत,हे कळल्यावर मात्र सर्व वादक आपल्या व्यवहाराबद्दल ख़जिल झाले। स्टूडियोचे दरवाजे उघडण्यात आले.साधारण चार तासात गाणं रिकॉर्डही झालं।रफ़ी साहेब सर्वांचे आभार मानून निघून गेले।पुन्हा वादकांचा संप सुरु झाला।

झाल्या प्रकाराबद्दल शंकर जयला अजिबात आश्चर्य वाटलं नाही,किंवा रागही आला नाही।जिथे रफ़ी हे नाव आहे,तिथे प्रेमाचा झरा आहे,याची त्यांना जाणीव होती।हो,रफींच्या माणूसकीची अशी अनेक उदाहरणं आहेत।इतकं असूनही या मतलबी दुनियेत रफ़ी साहेबांनी अनेक अपेक्षाभंग,अनेक मानसिक आघात झेलले,पण त्यांच्या मनातील गोडवा कधीही कमी झाला नाही।याच गोडव्याला,आज त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा अभिवादन करू या,सलाम करू या.

आणि हो,वर उल्लेख केलेलं ते गाणं,तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं,.... म्हणजेच

याद न जाये,बीते दिनों की..... ( दिल एक मंदिर)




    

Tuesday, November 24, 2015

दरवर्षी दिवाळी घरी-दारी आनंद घेवून येते। आपण सर्वजण मोठ्या आतुरतेने या सणाची वाट पाहत असतो।दिवाळीच्या निमित्ताने एक चैतन्य आपण अनुभवत असतो। नव्या उमेदीची,नव्या क्षणांची ही पहाट हळूहळू नूतन वर्षाची दारं उघडून देत असते।नवे कपडे,दिवाळीचा फराळ,आप्तेष्टांच्या गाठीभेटी दीपावलीचा अविभाज्य भाग असतात।पण रसिक वाचकाचं मन मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर येणाऱ्या दिवाळी अंकांची वाट पाहत असतं।सगळेच दिवाळी अंक विकत घेणं शक्य होत नाही,तेव्हा ग्रंथालयं काही माफक रकमेच्या मोबदल्यात आपल्याला ते उपलब्ध करून देतात।एकंदरीत हा साहित्य फराळ पुढचे काही महीने तरी आपली सोय करत असतो।

दिवाळी अंकामधे लिखाण करावं हे तर प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं।त्या निमित्ताने त्याला हव्या त्या विषयावर विस्तृत लेखन करता येतं आणि मोठा वाचकवर्गही मिळतो।माझ्या सारख्या नवोदित लेखकालाही या वर्षी दोन दिवाळी अंकांमधे लिहिण्याची संधी प्राप्त झाली।जेष्ठ पत्रकार श्री अरुण खोरेजी आणि पुण्यातील जेष्ठ वकील शिरीष शिंदेजी यांच्या सहकार्याने हे शक्य झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।

श्री अरुण खोरे यांच्या 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' या दिवाळी अंकात मी रफ़ी साहेबांच्या जन्म गावाविषयीचा माझा अनुभव मांडलेला आहे.काही वर्षांपूर्वी या महान पार्श्वगायकाच्या प्रेमाची ओढ़ मला तिथे घेवून गेली।रफ़ी साहेबांचा ज्यांना सहवास लाभला आहे,अशा काही मंडळींना भेटण्याचा योग या निमित्ताने आला।'लोकशाहीसाठी समंजस संवाद' हे एक उत्कृष्ठ दिवाळी मासिक आहे. स्वत: श्री अरुण खोरे यांनी बिहारच्या निवडणुकीचं केलेलं अप्रतिम विश्लेषण असो किंवा महान गायिका भारत रत्न एम एस सुबलक्ष्मी यांच्या  जीवनाचा आढावा घेणारा लेखिका सुलभाताई तेरणीकर यांचा लेख असो,वाचकांना समृद्ध करणारे असे अनेक लेख या दिवाळी अंकात आहेत।

२०१५ हे 'साहित्य लोभस'चं २३ वं वर्ष।श्री जयंत शिंदे आणि जेष्ठ वकील शिरीष शिंदे यांचं संपादन आणि मार्गदर्शन लाभलेली ही साहित्य मैफल.जेष्ठ लेखक राजन खान,उत्तम कांबळे,द मा मिरासदार अशा दिग्गजांच्या लेखणीने समृद्ध झालेला आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर अचूक प्रकाश टाकणारं मुखपृष्ठ असलेला हा एक उत्तम दर्जाचा दिवाळी अंक म्हणता येईल,यात शंका नाही।
आदरणीय शिरीष शिंदे जी,हे नेहमीच नवोदित साहित्यकारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत।कौतुकाची पाठीवर थाप देवून वेळोवेळी त्यांनी माझाही उत्साह वाढवला आहे,त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।२०१४ च्या 'साहित्य लोभस' मधे मला पहिल्यांदा लिहिण्याची संधी मिळाली।या वर्षी 'माणसाला समजून घेताना' या लेखातून मी माझे विचार मांडले आहेत।मनुष्याने दाखवलेली थोडीशी समजूतदारी कशी त्याच्या सोबत अनेक लोकांचं आयुष्य सुसह्य करू शकते या तत्वाचा आधार घेऊन मी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मला दिवाळी अंकांमधे लेखनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्री अरुण खोरे आणि शिरीष शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' आणि 'साहित्य लोभस' या दोन्ही दिवाळी मासिकांना शुभेच्छा देतो। 
  



              

Wednesday, November 11, 2015

बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोई
जो मन खोजा आपना
मुझ से बुरा न कोई

संत कबीर,आपल्यालाच आपल्यामधे डोकवायला शिकवतात।सदैव दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहायची सवय लागलेल्यांच्या डोळ्यांमधे घातलेलं अति आवश्यक अंजन आहे ते. आपण केलेल्या चूका,आपण मान्य न करता,खुप सहज पणे त्याचा दोष दुसऱ्यावर थोपवतो।स्वत:लाच स्वत: पासून वाचवण्याचा तो एक सोपा मार्ग असतो।सगळी गणितं तिथेच बिघडत जातात।गोष्टी साचत जातात।चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, एवढं साधं सोपं तर उत्तर असतं।पण चांगलं ते माझं आणि चुकीचं ते दुसऱ्याचं, असं म्हणत आपला अहंकार आपल्याला निसरड्या वाटेवर ढकलून मोकळा होतो आणि पुढे तर सगळी दलदलच असते।

आपणच आपल्याला अनेक गोष्टींमधे विभागून घेतो।मी या पक्षाचा,या जातीचा,या प्रदेशाचा असा एकदा स्वत:वर शिक्का मारून घेतला की आपआपल्या बाजूंचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायला आपण मोकळे होतो।चुकीच्या गोष्टींचं केलेलं समर्थन कधी ना कधी आपल्यालाच त्रास दायक ठरतं।शेवटी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असते।जरा सूक्ष्म विचार केला तर सहज ही गोष्ट आपल्या ध्यानात येईल।त्यामुळे विचार करून बोललं पाहिजे,कृती केली पाहिजे।

दिवाळी आहे,घरात दारात दिव्यांची आरास आहे.शुभेच्छांची देवाण घेवाण पण आहे.पण समजूतदारीची एक पणती अजूनही आपल्या मनात तेवण्याची वाट पाहते आहे.चांगल्याचं मनापासून,मन भरून कौतुक करू,चुकलेल्याला योग्य ती वाट दाखवू .एखादी प्रिय वा अप्रिय घटना (वैयक्तिक किंवा सामाजिक) आपल्या सोबत जेव्हा घडते,तेव्हा उगीचच काही घडत नसतं,याचं भान ठेवायला हवं.चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी काही ना काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत हे तत्व लक्षात असेल तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत राहतील यात शंका नाही।छोट्याश्या या अनिश्चित आयुष्यात एवढं तरी संतुलन साधायचा प्रयत्न करू. समाजातील सर्वच घटकांचा थोड़ा थोड़ा का होईना या तराजूला हातभार लागू दे.म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकून आजच्या घडीला रुंद होत चाललेली अविश्वासाची दरी भरून निघायला मदत होईल।

आपल्या उंबरठ्यावर इमानाचा,माणुसकीचा एक दिवा लावताना,त्याचा प्रकाश शेजारच्या घरी पण पडावा।म्हणजे प्रकाशात प्रकाश मिसळून ,भेदभावाचा अंधार दूर होईल । हातात हात येऊन ,माणसाला माणूस जोडला जाईल आणि एका घट्ट बंधनात आपला देश गुंफला जाईल,हीच आशा उराशी बाळगून आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतो।जय हिंद…

मनिष गोखले 
पुणे  









       

Sunday, October 11, 2015

अमिताभ आणि रफ़ी 

११ ऑक्टोबर १९४२ ला जन्मलेला अमिताभ, आज ७३ वर्षाचा झालाय।हरिवंशराय बच्चन यांच्या सारख्या महाकवीचा हा सुपुत्र।नुसता रुपेरी पडद्यावरचा महानायकच नाही तर असल जीवनातही त्याचा अत्यंत सुसंकृत वावर।भाषा हिंदी असो वा इंग्रजी,अमिताभ कडून सदैव शुद्ध भाषेचीच खात्री।आदर्श असं त्याचं व्यक्तिमत्व।

साधारण ३ वर्षापुर्वी रफ़ी साहेबांच्या सुनेनी लिहिलेल्या एका पुस्तक (Mohd.Rafi :My Abba) प्रकाशनावेळी तो रफ़ी साहेबांविषयी भरभरुन बोलला।रफ़ी साहेबांचं अस्तित्व हे दैवी होतं।जिथे जिथे ते जायचे,एक प्रसन्नतेचं वलय आपोआप निर्माण व्हायचं।पुढे अमितभनी एक किस्सा सांगितला,तो खुप बोलका आहे.

साधारण १९७७ ची गोष्ट। पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कपूर खानदानानी दोन दिवसांचा एक संगीत समारोह सिलीगुड़ी (पश्चिम बंगाल) इथे आयोजित केला होता।पहिल्या दिवशी रफ़ी साहेबांचा कार्यक्रम होता।जो त्यांनी नेहमी सारखाच अत्यंत प्रभावीपणे सादर केला। दुसऱ्या दिवशी मुंबईहून अन्य काही गायक येऊन गाणार होते। सम्पूर्ण कार्यक्रमविषयी स्थानिक लोकांमधे कमालीची उत्सुकता होती।पहिल्या रात्रीचा आपला कार्यक्रम आटपून रफ़ी साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई कड़े रवाना झाले।साधारण सकाळी दहाचं त्यांचं विमान होतं।इकडे दुसऱ्या दिवशी कार्यक्रमासाठी येणारे गायकवर्ग, काही कारणास्तव येवू शकणार नसल्याची अचानक बातमी आली.शशी कपूर यांच्या समोर आता पेच निर्माण झाला। त्यानी अमिताभला लवकरात लवकर विमानतळावर जाऊन,कसंही करून रफ़ी साहेबांना थांबवण्याची विनंती केली।त्या काळी सिलिगुड़ीचं विमानतळ हे शहरापासून बरंच लांब होतं।अमिताभ कसाबसा दहाच्या सुमारास विमानतळावर पोहोचला।घाईघाईने विमानतळ अधिकाऱ्याला त्यानं गाठलं व काहीही करून ते विमान थांबवण्याची विनंती केली।त्वरित हालचाली सुरु झाल्या व सुटण्याच्या बेतात असलेलं ते विमान थांबवण्यात आलं. अमिताभ आणि तो अधिकारी विमानात दाखल झाले।साक्षात अमिताभ बच्चन विमानात अवतारल्यानं प्रवाश्यांमधे एकच खळबळ उडाली।अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केलं व अमिताभला ते रफ़ी साहेबांपर्यंत घेवून गेले।

अमिताभ,आपल्या भाषणात पुढे म्हणतो,नेहमी प्रमाणेच शांत चित्तानं रफ़ी साहेब बसलेले होते। एकदम अमिताभ ला समोर पाहून त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं। तो म्हणतो I folded my hands and made a request to stay. रफ़ी साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न लावता,त्याच्या विनंतीला होकर दिला। तो म्हणतो,त्या क्षणी कुठेही रफ़ी साहेबांच्या मनाला अहंकार शिवल्याचा भासही झाला नाही।त्यांची ही खिलाडू वृत्ती माझे डोळे ओले करून गेली।रफ़ी साहेब दुसऱ्या दिवशीही तेवढंच समरसून गायले,हे वेगळं सांगायला नकोच।अमिताभ पुढे नमूद करतो की रफ़ी साहेबांना लोक फरिश्ता का म्हणतात,हे त्या दिवशी मला कळलं।

दोन महान कलाकारांची ही कहाणी।मोठया मनाची माणसंच खऱ्या अर्थानं मोठी होतात,मग तो अमिताभ असो किंवा रफ़ी साहेब।
अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।     

Friday, October 9, 2015

ये हसीं शाम और ये महफ़िल,बहोत बहोत स्वागत है आप सभी लोगो का.

दोस्तों,जब जब हिंदी फिल्मो का ज़िक्र होता है,हम उस सुनहरे दौर को याद करते है. अमूमन १९५० से लेके १९७० तक के दौर को हम सुनहरा माना जाता है। ये वो दौर था, जिसमे,बहोत अच्छी कहानिया होती थी,एक से  बढ़ के एक कलाकार,परदे पर अपना किरदार निभाते हुवे नज़र आते थे.एक सादगी नुमा माहौल होता था.इसी की बदौलत, हम उन फिल्मो से अपने आप को जोड़ पाते थे.एक अपनाइयत का अहसास, हमे उन फिल्मों से होता था.संगीत एक बेहद अहम हिस्सा हुवा करता था. दिल को छू लेने वाली कुछ आवाज़े थी. अल्फ़ाज़ के वो बेहतरीन कारीगर थे जैसे साहिर,मजरूह,शकील,हसरत ,शैलेन्द्र और राजेन्द्र क्रिशन/आवाज़ और अल्फ़ाज़ को जोड़नाले वो आलातरीन संगीतकार थे.हम नौशाद साहब को याद करते है। हम सी रामचन्द्रजी को सलाम करते है शंकर जयकिशन,ओ पी नय्यर,मदन मोहन,रोशन,सचिन देव बर्मन ऐसे नाम हमारे दिल के करीब होते है.
दर-असल ये ऐसे लोग है,के जो हमारी जिंदगी का हिस्सा है.हमारी साँसों में बसनेवाले है. हमारी जिंदगी को रोशन करनेवाले है. हमारा भी फ़र्ज़ है की हम इनका तह ए दिल से अहतराम करे और करते भी है.कोई इनको दुवाए दे जाता है,कोई अपनी तक़रीर में बड़े अदब से इनका  ज़िक्र करता है ,तो कोई इनकी शान में एक किताब लिख देता है.

'सरगम के सितारे' ये ऐसी ही एक किताब है जो संगीतकारों की शान में लिखी गयी है और आज मंज़र ए आम पे आने के लिये बेताब है.
लेखक श्रीकांत देशपांडे यांच्या या पुस्तकाचं आज प्रकाशन होतंय।
संगीत आणि पत्रकारिता या क्षेत्रातील काही मान्यवर आज आपल्याला इथे पाव्हने म्हणून लाभलेले आहेत।
एक छोटासा स्वागत समारंभ(वेलकम ceremony) आपण करणार आहोत।

Friday, September 11, 2015

ओळख आमची स्वप्नापुरती
अन जागेपणीचा शोध निरंतर
ती भेट दूर त्या क्षितिजावरची
अन दोन प्रवासरेषा समांतर
      

Wednesday, September 9, 2015

ये बहती हवा जो तेरा आँचल उड़ा दे रही है
क्या कहे किसी शोले को वो हवा दे रही है
हर दर्द भूले जा रहा हूं मैं तो इस ज़माने के
मेरी नज़रे जो मुझे हर गम की दवा दे रही है
वो निगाहों का तबस्सुम,वो शर्म हलकी सी
मेरी दबी हसरतो को इक जुबां दे रही है
बेकरारी में मेरे कदम बढ़ न जाये कही
आहिस्तगी में जो पारसाई दगा दे रही है













Thursday, September 3, 2015

न शौक ए वस्ल का दावा,ज़ौक़ ए आशनाई का 
मै इक नाचीज़ बंदा और उसे दावा खुदाई का 

वस्ल--मिलन ,ज़ौक़ --शौक 
आशनाई-ओळख 

मला मिलनाची इच्छाही नाही किंवा कुणाची ओळख करून घेण्याचा शौकही नाही।मी ईश्वरी भक्तीमधे रममाण होणारा एक साधा माणूस आहे.

कफ़स हु मगर सारा चमन आखो के आगे है 
रिहाई के बराबर अब तसव्वुर अब है रिहाई का 

कफ़स --तुरुंग 
तसव्वुर --ख़याल 

कैदेमधे किंवा तुरुंगात असूनही माझ्या नजरेत अजूनही बाहेरचं सगळं सुखी असलेलं जग डोळ्यासमोर आहे.
त्यामुळे सुटकेचा नुसता विचार देखील खरोखरच्या सुटके सारखाच आहे.

नया अफ़साना कहे वाइज़,तो शायद गर्म हो महफ़िल 
क़यामत तो पुराना हाल है रोज़ ए जुदाई का

वाइज़ --धर्मोपदेशक 

उपदेश कारणाऱ्यानी जर नवी काही कहाणी सांगितली,तर काही मजा आहे. नाही तर विरह म्हणजे प्रलय हा प्रकार तसा आता जुनाच झालाय।

बहार आई है अब अस्मत का पर्दा फाश होता है 
जुनूँ का हाथ है आज और दामन पारसाई का   

अस्मत --पावित्र्य,शील
पारसाई --संयम,निग्रह  
प्रेमाचा मौसम आला संयमाच्या मर्यादा गळून पडतात।जणू वेडेपणानी एका निग्रहाला संपवायचंच ठरवलंय।

Sunday, August 30, 2015

ये तेरे दामन की खुशबू,मेरी सांसो में घूल जाने दे
लिल्लाह! मेरी तश्नगी, इस दर्या में मिल जाने दे
छुप छुप जल उठा हू,एक आग सी लिये इस दिल में
तू दीदार ए आतिश कर और धुवा सीने से उठ जाने दे
तेरे सुर्ख़ लबों के साहिल और मेरी हसरतो की मौजे
ता-उम्र मेरी तमन्नाओं को,इसी किनारे बस जाने दे
देख मै इश्क़ ले आया हू,तेरे नायाब हुस्न की खातिर
ये सौगात ए ज़िंदगी मुझको,तेरे नाम कर जाने दे
क्या आरज़ू ए वस्ल नहीं है,तेरी बेताब हसरतो को
अब न रोक सनम ऐसे खुद को,जो होता है हो जाने दे.

लिल्लाह... अल्लाह के लिये.
आतिश.. आग
सुर्ख.... लाल
ता उम्र... उम्रभर
नायाब.. दुर्मिळ
वस्ल.. मिलन




Saturday, August 29, 2015

वो अपना तो न हो सका,पर उसे तनहा कैसे छोड़ दू
मुझे तो मोहब्बत है उस से,मै ये दावा कैसे छोड़ दू
जहा पायी है मैंने अक्सर,मेरे ख्वाबो की बस्तिया 
उसके घर को जाता हुवा,ये रास्ता कैसे छोड़ दू 
बस कज़ा ही छीन सकती है,मुझसे मेरी ये हसरते 
साँसों के होते हुवे,मै ये ख़्वाब आधा कैसे छोड़ दू 
माना के कुछ टूटा सा है,ये नशेमन मेरी उल्फ़त का  
पर अहसास के इन तिनको को,बिखरा कैसे छोड़ दू  
ऐ खुदा वो कही भी रहे,बस खुश रहे इस जहा में
मै आऊ न आऊ तेरे दर पे,पर ये सजदा कैसे छोड़ दू 
  
नशेमन--घरटं 
तिनका--काडी 
कज़ा --मृत्यू 


Wednesday, August 19, 2015

था गुलों में छुपाये हुवे,काटों का चलन
रहा इक उम्र हमे भी,किसी के दोस्ती का वहम
कहा वो उम्मीदे और वो शौक वफ़ा के
अब के जाना के,सारे इमान हुवे है रहन
हम गरीबों को हक़ नहीं,के कोई शिकवा करें
मुफलिसों के माथे,सजती नहीं ये शिकन
कतराता है हर सच्चाई से,ये बेमुरव्वत जहां
यही बनती है आखिर,कई दिलो की चुभन
सीखा है जो गम में भी,यू मुस्कुराना हमने 
खुली फ़िज़ा में कुछ परिंदो को,हो रही है घुटन    


रहन--गहाण ठेवणे,गिरवी रखना 
मुफ़लिस-ग़रीब 
बेमुरव्वत--निर्लज्ज  
शिकन-कपाळावरची आठी 

Tuesday, August 11, 2015

कभी मिलेंगे अजनबी बनके
शायद नयी पहचान हो जाये
यु तो है ये घड़िया मुश्किलो भरी
क्या पता कुछ आसान हो जाये
बहोत हो चुकी ये बदग़ुमानिया
आओ फिर से नादान हो जाये
खोये हुवे तवाज़ून की खातिर
काश ये वक़्त मीज़ान हो जाये
आ साथ चले दर ए खुदा की जानिब 
नयी ज़िंदगी की आज़ान हो जाये

तवाज़ून-संतुलन 
मीज़ान --तराज़ू 

Friday, July 31, 2015

 रफ़ी साहेबांचा शेवटचा दिवस--३१ जुलै १९८०

आज गुरुपूर्णिमा।गुरुपूर्णिमा हा आपल्या गुरुला वंदन करण्याचा दिवस।
नुसतं आपल्या संगीताने या सर्वांना मंत्र मुग्ध करणारेच नाहीत तर आपल्या संपूर्ण आयुष्यद्वारे तमाम जगाला मानवतेचा एक हळवा स्पर्श देणारे एक संत,अशी रफ़ी साहेबांची ओळख.आज त्यांची ३५ वी पुण्यतिथी।हा थोड़ासा प्रयत्न त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांमधे डोकवून पाहण्याच्या,त्यांना अजुन समजून घेण्याचा।

आपल्या नित्याप्रमाणे रफ़ी साहेब पहाटे उठले। साधारण सकाळी १० वाजता त्यांनी मशहूर बंगाली संगीतकार 
श्यामल मित्रा यांना आपल्या घरी बोलवलं होतं। काही दिवसातच येणाऱ्या दुर्गापूजेसाठी त्यांना आरत्या बसवायच्या होत्या. रफ़ी साहेब बैडमिंटन खेळून,आपला रियाज़ आटपून तयार होते. 

ठरल्या वेळेप्रमाणे श्यामल मित्रा आले. सुरवातीच्या चहापानानंतर संगीत सेवेला प्रारंभ झाला।रफ़ी साहेब 
मात्र थोड़े अस्वस्थ होते. एक दोन वेळा श्यामल मित्रांनी त्यांना तब्येती बद्दल विचारलं तेव्हा रफ़ी साहेबांनी आपला रियाज़ सुरु ठेवण्याबद्दल हरकत नसल्याचं सांगितलं पण काही वेळातच बेचैनी असह्य झाली।आणि रफ़ी साहेब मित्रांच्या परवानगीने थोड़ा आराम करायला आपल्या खोलीत गेले. रफ़ी साहेबांच्या घरच्या लोकांना  चिंता वाटायला  लागली। रफ़ी साहेबांचे मेव्हणे ज़हीर बारी यांनी फॅमिली डॉक्टरांना बोलवलं। त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याची आशंका आली.प्राथमिक तपासणी नंतर त्यांनी रफ़ी साहेबांना जवळच्या नेशनल हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।

बिल्क़िस बानो (रफींच्या पत्नी) यांनी श्यामल मित्रा यांना रफ़ी साहेबांच्या तब्बेतीची बातमी सांगितली व
दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं।रफ़ी साहेब चालतच घराबाहेर पडले।आपल्या गाडीतून नेशनल हॉस्पिटल मधे गेले।

नेशनल हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी रफ़ी साहेबांचा ECG केला।परिस्थितितीचे गांभीर्य लक्षात घेवून बॉम्बे हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।तो पर्यंत रफ़ी साहेबंच्या जवळच्या लोकांना थोड़ी खबर लागली होती.
आताशा रफींची तब्येत खालवायला लागली होती. ह्रदय आक्रोश करायला लागलं होतं।मनुष्याच्या हातून, आयुष्याचा प्रश्न देवाच्या दरबारी पोहोचला होता।

त्याही अवस्थेत रफ़ी साहेब मात्र अल्लाह ची माफ़ी मागत होते. त्यांच्या मनाला एक टोचणी लागली होती. श्यामल मित्रांना परत जावं लागलं,ही गोष्ट त्यांच्या मनातून जात नव्हती।या वरून रफ़ीसाहेबांच्या मनाची,त्यांच्या माणुसकीची कल्पना येते।साक्षात मृत्यू समोर असतानाही ते दुसऱ्याचाच विचार करत होते.

त्या पावसाळी वातावरणात बाहेर वादळ सुटलेलं होतं। रफ़ी साहेबांच्या हृदयात वीज चमकत होती।डॉक्टरांचे
प्रयत्न अपूरे पडत होते।शेवटी रात्री १० वाजून २५ मि नी आपल्या असंख्य गीतांना श्वास देणाऱ्या रफ़ी
साहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला।

डॉक्टरांना देखील हुंदका आवरत नव्हता।कारण रफ़ी साहेबांचं असं जाणं  म्हणजे सर्वांसाठी आपल्या वरची छत्रछाया निघून जाण्यासारखं होतं।

तो टीवी आणि इंटरनेट चा जमाना नसूनही ही बातमी वेड्यासारखी पसरली। असंख्य जीव हळहळले,करोडो डोळ्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली,हजारो पावलं मुंबईच्या दिशेनी वळली। या देवदूतावरच्या प्रेमानी
हे घडवलं होतं।

दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट ला,आतापर्यंतची(चित्रपट सृष्टीतील) सर्वात मोठी यात्रा निघाली। हळूहळू जूहू कब्रस्तानकडे रफ़ी साहेब आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत निघाले होते. व संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मि नी ते एकटेच पुढे गेले आणि धरती मातेच्या गर्भात विसावले।

आजही मी पाहतो,रफ़ी साहेबांचे नाव येताच लोक हळवे होतात.त्या हळव्या मनावर फुंकर घालण्यासाठी लोकांना पुन्हा रफ़ी नावाच्या स्वराचाच आधार घ्यावा लागतो।

नाही तरी रफ़ी साहेबांनीच म्हणून ठेवलय,

जी करता है जीते जी मै यु ही गाता जाउ
गर्दिश में थके हारो का माथा सहलाता जाऊ


रफ़ी साहेबांना विनम्र श्रद्धांजली।।।।


मनीष गोखले
पुणे
9822859270









रफ़ी साहेबांनी रिकॉर्ड केलेलं शेवटच गाणं

he recorded 4 line sher on 28th july 1980,3 days before his death

तेरे आने की आस है दोस्त
ये शाम फिर क्यों उदास है दोस्त
महकी महकी फ़िज़ा ये कहती है
तू कही आसपास है दोस्त

फिल्म--आसपास
संगीत --लक्ष्मी प्यारे
गीत --आनंद बक्शी 
रफ़ी साहेबांची १० सोलो गीते

१. मधुबन में राधिका नाचे रे --कोहिनूर (संगीत -नौशाद,गीतकार --शकील बदायुनी )
२. अहसान तेरा होगा मुझपर --जंगली (शंकर जयकिशन/हसरत जयपुरी)
३. खोया खोया चाँद --काला बाज़ार (सचिन देव बर्मन /शैलेंद्र)
४ मुझे दर्द ए दिल का पता न था --आकाश दीप (चित्रगुप्त/मजरूह )
५. ऐसे तो ना देखो --तीन देवियां (सचिन देव बर्मन/मजरूह)
६. चाहूंगा मै तुझे साँझ सवेरे--दोस्ती (लक्ष्मी-प्यारे/मजरूह)
७. तेरी प्यारी प्यारी सूरत को--ससुराल (शंकर जय किशन/हसरत)
८. फिर आनेलगा याद वोही -- ये दिल किसको दू(इक़बाल कुरैशी)
९. पुकारता चला हूँ मै --मेरे सनम (ओ पि नय्यर /मजरूह)
१०. बंदा परवर थाम लो जिगर--फिर वही दिल लाया हूँ (ओ पी नय्यर /मजरूह)

१० duets  of  रफ़ी साहब 

१)एक शहंशाह ने बनवा के हँसी ताज महल --लीडर (नौशाद/शकील )with Lata
२ )दीवाना हुवा बादल ---कश्मीर की कली --(ओ पी नय्यर/S.H.Bihaari)with asha
3)तुझे जीवन की डोर से --असली नक़ली (शंकर जयकिशन /हसरत)with lata
४)तेरी बिंदिया रे --अभिमान (सचिन देव बर्मन /मजरूह)with lata
५)सुन सुन सुन ज़ालिमा --आरपार (ओ पी नय्यर /मजरूह)with Geeta dutt
६) देखो रूठा न करो --तेरे घर के सामने (सचिन देव बर्मन/हसरत)with lata
६)जो वादा किया वो --ताजमहल (रोशन /साहिर)with lata
७)जीवन में पीया तेरा साथ रहे--गूंज उठी शहनाई (वसंत देसाई/भरत व्यास)with lata
८)झिलमिल सितारों का आँगन होगा--जीवन मृत्यु (लक्ष्मी प्यारे ,आनंद बक्शी )with lata
९)दो सितारों का जमीं पर --कोहिनूर (नौशाद/शकील)with lata
१०)आज कल तेरे मेरे प्यार के सपने --ब्रम्हचारी (शंकर जयकिशन/हसरत )with suman kalyan pur



Monday, July 27, 2015

मुद्दते हो गयी है देखो सिमटते सिमटते 
चलो हम आज ज़रा बिख़र के तो देखें
ज़र्रा ज़र्रा बन के कुछ आज़ाद हो जाये 
हर सू इस जहाँ से ज़रा गुज़र के तो देखें 
अब कोई आस नहीं है नयी उचाईयों की 
किसी दिल की गहरायी में उतर के तो देखें
थक से गये है जो ग़मों से बचते बचते  
कभी खुशियों से भी ज़रा मुकर के तो देखे
फ़िक्र अपने ही अश्क़ो की क्यों रहे हरदम 
कभी दर्द किसी और की नज़र के तो देखें 
दर ए खुदा पे सजदे,तो है रोज़ की कहानी
कभी बूढ़े मां बाप के कदमो में ठहर के तो देखें  

हर सू --हर तरफ़ 

@ मनिष गोखले... 


   

Saturday, May 16, 2015

हम होश खोये हुवे है,तो बड़ी बात क्या 
आसमाँ खुद परेशां है,तुझे ज़मीं पे देख कर 
उतर आ जाये खुदा,शायद इस जहाँ में 
और गुज़ार दे ज़िंदगी,तुझे यहीं पे देख कर 

@ मनिष गोखले... 

Tuesday, April 21, 2015

बेमक़सद ही निकला था घर से 
पर कुछ ले के मै लौट आया हू 
शायद कुछ कमा के आज नहीं लाया 
पर एक तजुर्बा अपने साथ लाया हूं 
तौहीन अपनों ने की,परायो ने साथ निभाया 
देखो मै आज अपनों का ही सताया हू 
अब हर गम पे हसने की ठानी है मैंने 
इसलिये आज जी भर के मुस्कुराया हू 


Saturday, April 18, 2015


खुद ही ढूंढता हू तुझको शिद्दत से
और तेरी आहट पे लरज़ जाता हूं
जब  सम्हल नहीं पाता इस उलझन से 
तब अश्क़ बन के बरस जाता हू
फिर भी रहती है जब बाकी,आरज़ू तेरे दीदार की
आ के चुपके से तेरे कूचे में,मै ठहर जाता हू   

लरज़ जाना--कांपना 




खुद ही ढूंढता है कोई तुझको
और तेरी आहट से लरज़ जाता है

Wednesday, April 8, 2015

मेरी कहानी नहीं कहती,मेरे हाथों की लकीरें
देखू गौर से जो इन को,तो तेरा ही ज़िक्र पाता हूँ 
कुछ हाल है ऐसा ही,आजकल मेरी आँखों का
जानिबे-खुदा भी देखू,तो तेरा ही अक्स पाता हूँ 

@ मनिष गोखले... 

Tuesday, April 7, 2015

तुझसे दूरियों का न कभीशिकवा किया मैने
जहा पड़ा तेरा साया,वही सजदा किया मैने
बड़े फ़क्र से वो धूल, सजा के अपने माथे
किस्मत की लकीरों को यू ज़िंदा किया मैंने


Wednesday, March 18, 2015

...न मिला पाउंगा

पलकें झुका ली है मैंने,नज़रें न मिला पाउँगा 
ज़ख्म मेरे ख़्वाबों का,तुम्हें न दिखा पाउँगा  
कही ग़म न दे बैठू तुम्हें,मै उम्र भर के लिये  
इक और बोझ ये सीने पे,मैं न उठा पाउँगा  

@ मनिष गोखले... 

Monday, March 16, 2015

...देख ले

तू भी रो ले ऐ खुदा, मेरे अश्क़ो के ज़रिये
और मेरी तरह ये दर्द भी उठा के देख ले
एक आग सी लिये फिरता हूँ मै सीने में
मुझे अपने सीने से भी कभी लगा देख ले 

Wednesday, February 25, 2015

वो हम न थे,वो तुम न थे। …… 

सुमारे तीन एक वर्षापुर्वी रफ़ी साहेबांच्या आवाजात काही शब्द कानावर पडले।रफ़ी साहेबांची इतकी गाणी पाठ असून सुद्धा,हे गाणं आपण ऐकायचं कसं राहून गेलं असं वाटत राहिलं।एक कवि अचूकपणे कसं सर्वांच्या मनातलं बोलून जातो आणि ते गाणं आपल्याला आपलं वाटायला लागतं।

गुजर रही है तुम पे क्या,बना के हम को दर ब दर,
ये सोच कर उदास हू,ये सोच कर है चश्म तर
न चोट है ये फूल की,न है खलिश ये खार की
लूटी जहा पे बेवजह,पालकी बहार की

चश्म तर --पाणावलेले डोळे
खार ---काटा

प्रेमात काही कटु अनुभव किंवा विरह सहन करून सुद्धा,आपल्या प्रिय व्यक्तिच्या व्यथेचीच काळजी।
केवढा हा निःस्वार्थ,फ़क्त शुद्ध भावनांची ,खऱ्या प्रेमाची साक्ष देणारा।

गुजर रही है तुम पे क्या। ……ज्या व्यक्ति कडून दुःख मिळालं,त्याच व्यक्ति बद्दल काळजीचे,सहनुभूतीचे सूर.…

कवि गोपालदास 'नीरज' यांच्या लेखणीतून आलेले शब्द। … प्रत्यक्ष सलाम नहीं करता आला तरी मन मात्र अशा प्रतिभे समोर आपोआप नतमस्तक होवून जातं।
१९६४ च्या चा चा चा या चित्रपटातील हे गाणं।इकबाल कुरैशी साहेबांचं संगीत,रफ़ी साहेबांचा स्वर आणि एक से एक सुन्दर गाणी आहेत या चित्रपटात ।पण हे गाणं मला सगळ्यात भावलेलं।

"वो हम न थे,वो तुम न थे
वो रहगुजर थी प्यार की
लूटी जहा पे बेवजह
पालकी बहार की"

ते माझं किंवा तुझंही नव्हतं,ते एका समान धाग्याच्या बंधनाचं अस्तित्व होतं।
आज ते बंधन काही कारण नसताना मोकळं झालंय। हा 'बेवजह' शब्द नीरज यांनी इथे फार
परिणाम साधत वापरलाय।

चार कड़वी,प्रत्येक शब्द किती अर्थपुर्ण।

विशेषत: तिसरा अंतरा।।।।।।
ये कौनसा मक़ाम है
फलक नहीं,जमीं नहीं
ये शब नहीं,सहर नहीं
के गम नहीं,ख़ुशी नहीं
कहा ये लेके आ गयी,हवा तेरे दयार की
लूटी जहा पे बेवजह
पालकी बहार की
(दयार---घर)

मनात जी एक पोकळी निर्माण झाली आहे,त्या पोकळीचं या पेक्षा सुन्दर ते काय वर्णन असू शकणार।
हे निर्विकार मन मला तुझ्या अस्तित्वाच्या दिशेनी घेवून गेलं आणि जिथे त्यानी मला आणून सोडलंय,तिथे
सुख दुःख राग लोभ या कशाचाच परिणाम नाहीये।सगळंच शून्य आहे.सगळंच शून्य आहे.

गोपालदास सक्सेना 'नीरज' यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या इटावा जिह्यातल्या पुरावली या खेड्यात झाला।कानपूरहून एम.ए. झाल्यावर ते अलीगढ़ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले।महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना कविता करण्याचा नाद जडला।आणि अल्प कलावधीतच नीरज हे एक उत्तम कवी म्हणून मान्यता पावले।१९६० साली नीरज एका कार्यक्रमासाठी मुंबईला आर.चंद्रा नावाचा एक तरुण चित्रपट निर्माता त्यांना येऊन भेटला।तो देखील अलीगढ़ विद्यापीठाचा विद्यार्थी होता।त्याने 'बरसात की रात' नावाचा चित्रपट आधी बनवला होता।आता तो 'नयी उमर की नयी फ़सल' या आपल्या नव्या चित्रपटाची तयारी करत होता।या नव्या चित्रपटसाठी नीरज यांनी गीतलेखन करावं अशी त्याची विंनती नीरज यांनी मान्य केली।पण काही ना काही कारणानी तो चित्रपट रखडला।पण इक़बाल कुरैशी यांचं संगीत असलेला 'चा चा चा' मात्र नीरज यांना मिळाला।'सुबह न आयी',एक चमेली के मंडवे तले','वो हम न थे' सारख्या अप्रतिम रचना नीरज यांनी दिल्या आणि या चित्रपट सृष्टीला एक प्रतिभाशाली कवी लाभला।नंतर प्रदर्शित झालेल्या 'नयी उमर की नयी फ़सल' मधल्या 'कारवाँ गुज़र गया' गीत एक इतिहास रचून गेलं।शैलेंद्रच्या निधनानंतर शंकर जयकिशन एका नव्या गीतकाराच्या शोधात होते।तेव्हा नीरज त्यांच्या पसंतीस उतरले।१६६८ चा 'दुनिया' हा या गीतकार-संगीतकार जोडीचा पहिला चित्रपट।त्यानंतर त्यांनी 'चंदा और बिजली','पहचान' मेरा नाम जोकर','लाल पत्थर','कल आज और कल' असे तब्बल सोळा चित्रपट केले।सचिन देव बर्मन यांच्या सोबतही नीरज यांची मस्त जोडी जमली।'प्रेम पुजारी','गैम्ब्लर','शर्मीली','तेरे मेरे सपने' या त्यांच्या चित्रपटातील संगीतानी रसिकांच्या मनात घर केलं।एवढं यश मिळूनही या चित्रपट सृष्टीत नीरज फार रमले नाहीत व स्वगृही परतले।हिंदी साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव मोठया सन्मानाने घेतलं जातं।'नीरज की पाती','बादलों से सलाम लेता हूँ' असे त्यांच्या अनेक संग्रहांना लोकप्रियता लाभली।२००७ साली त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला।        







Friday, February 20, 2015

...धड़क जाता है

धड़कनो के पहलू में,इक ख्वाब भी धड़क जाता है
आ के पलकों तले,जब वो मुझ से लिपट जाता है
हो जाता है मजबूर ज़र्रा ज़र्रा,यु ही भीग जाने को 
अहसास का बादल,जब शबनम लिए बरस जाता है 



Friday, February 6, 2015

Society of Indian Record Collectors (SIRC-Mumbai) च्या अमरावती शाखे तर्फे दरवर्षी एक कार्यशाळा 
आयोजित होते।नुकतीच ती ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी ला अमरावतीच्या विनायक सभागृहात संपन्न झाली।
'भूले बिसरे गीतकार' या वेळी असा विषय होता।

गीतकार म्हटलं की नेहमी आपल्याला लगेच साहिर,शकील,हसरत,मजरूह ,शैलेन्द्र ही नावं आठवतात।पण त्या पलीकडे किमान २०० च्या वर गीतकारांनी या चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळाला आपलं योगदान दिलं आहे. काही नावं कदाचित आपण ऐकलेली सुद्धा नसतात।काही वेळेला गाणं आठवत असतं पण त्या मागे मेहनत घेणारे माहित नसतात।आपल्या कलेला योग्य तो न्याय मिळावा,अशी प्रत्येक कलाकराची इच्छा असते।म्हणूनच SIRC अमरावती कडून हा प्रयत्न होता। एकूण ५० गीतकारांची निवड करण्यात आली.
वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना बोलण्याची संधी होती। एका गीतकरावर मी पण आपले विचार मांडले।

त्या गीतकराविषयी सांगण्या आधी एक किस्सा सांगतो।बरोबर ९ वर्षापूर्वी,३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २००६ ची ती मध्यरात्र होती।पुण्याच्या यशवंतराव मधे स्वत:संगीतकार ओ पी नय्यर यांच्या उपस्थितीत एक शानदार कार्यक्रम होवू घातला होता। मी प्रथमच नय्यर साहेबांना पाहत होतं।काहीही करून मध्यंतराच्या वेळेत त्यांना भेटायचं,असा हट्ट स्वताशीच केला होता. प्रयत्न सफलही झाला। केवळ दोनच लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली।त्यापैकी एक नशीबवान मी होतो।त्या VIP रूम मधे ५ मिनिटे का होईना,त्यांना भेटलो।

रफ़ी साहब ने गाया हुवा आपका पसंदीदा गीत कौनसा है?या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर फार छान होतं।ते म्हणाले,रफ़ी साहब तो हर एक गीत बहोत अच्छी तरह से गाते ही है.लेकिन इस गीत को जिस तरह से लिखा गया है,मै उस से बहोत मुतासिर हुवा हूँ. ये गीत शेवन रिझवी साहब लिखा है. इस गीत के जो अल्फ़ाज़ है,वो एक ऐसा असर पैदा करते है के आप की आखे नम हो जाती है.

वक़्त इंसान पे ऐसा भी कभी आता है 
राह में छोड़ के साया भी चला जाता है 
दिन भी निकलेगा कभी रात के आने पे न जा 
मेरी नजरो की तरफ देख,ज़माने पे न जा 
(हमसाया --१९६८)

हाच धागा पकडून अमरावती मधे गीतकार शेवन रिझवी यांच्या वर बोललो।
नय्यर यांच्या बरोबर त्यांनी एकूण १० चित्रपट केले।फ़क्त २२ गाणी लिहिलीत।पण प्रत्येक गाणं हे मोत्यासारखं आहे. बसंत,एक मुसाफिर एक हसीना,हमसाया,दिल और मोहब्बत,CID ९०९,एक बार मुस्कुरा दो असे चित्रपट केले।

१९४३ च्या राहगीर पासून शेवन रिझवी लिहीत होते। मग सुनहरे पल,सुरंग,लकीरे या काही चित्रपटांमधेही त्यांना संधी मिळाली।पण पहिल्यांदा त्यांचं खऱ्या अर्थानी नाव झालं ते एका क़व्वाली मुळे।ती कव्वाली 
आज ही मशहूर आहे. आणि असं म्हणतात,या कव्वाली मुळे कव्वाली या गीत प्रकाराला एक प्रकारचं नवीन आयुष्य मिळालं।बुलो सी रानी यांचं संगीत असलेली ती क़व्वाली अल-हीलाल(१९५८) चित्रपटातील आहे.…… 
हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालो ने,काले काले बालो ने,गोरे गोरे गालो ने ( गायक--इस्माएल आज़ाद )

एक मुसाफिर एक हसींना मधे तर अप्रतिम लिहिलंय रिझवी यांनी।
निकले तेरी तलाश में और खुद ही खो गये 
कुछ बन पड़ी न हमसे तो दीवाने हो गये 
दीवानगी ने फिर तेरा कूचा दिखा दिया 
हम को तुम्हारे इश्क़ ने क्या क्या बना दिया 

भाई वाह,अंगावर काटा नाही आला तरच नवल.
एवढी छान शब्द संपदा आपल्या करता सोडून जाणाऱ्या या गीतकराला सलाम।
आणि दरवर्षी अशा प्रकारचे सुन्दर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या SIRC अमरावती चे आभार। 

मनीष गोखले 
पुणे 
9822859270 
   

Friday, January 2, 2015

है के नहीं

चिलमन ख्वाबों की तो है दरमियाँ,जाने तू उस पार है के नहीं
मै तो मान चुका हूं तुम्हे अपना,तुम्हे मुझसे प्यार है के नहीं
तुझसे रोशन होने को है बेकरार,हर कोना मेरे आशियाने का
तुम तो हो मेरे दिल में,तेरी नजरो में मेरा ये दयार है के नहीं 

चिलमन --पर्दा 
दयार ---घर